सिया के राम ! की सियासत के ?
जय जय श्रीराम ! कधी नाही पण आज सकाळी सकाळी ५ वाजता अचानकच मला दचकून जाग आली. कारण मला स्वप्न हि तितकंच अचंबित करणारं पडलं होत, आपणा सगळ्यांंचा आदर्श प्रभू श्रीरामचंद्र कोर्टाच्या बाहेर ताटकळत उभा असून निकालाची वाट पाहतो आहे असं चित्र मला दिसत होतं आणि न्यायालयाच्या दुसऱ्या बाजूला हातात भगवे झेंडे घेऊन न्यायालयाच्या निकालाच स्वागत(कि अवमान?) करण्यासाठी रांगडी आक्रमक पोरं उभी आहेत. सगळ्यांचा एकच जयघोष अख्खा आसमंत दुमदुमून सोडतो आहे. बोलो बोलो जय श्रीराम ! जय जय श्रीराम ! खरे तर श्रीराम ह्या तिनाक्षरी शब्दात एवढी ताकद आहे की कदाचित मी ह्याच कारणामुळे झोपमोड होऊन उठलो असेल. शेवटी स्वप्न ते स्वप्नच. ते बऱ्याचदा काल्पनिकच असतंय. खरे तर रात्री झोपायच्या आधी मी टेलिव्हिजन वरचा विध्वंसक वाद पहिला होता. ह्याच कारणामुळे डोक्यात सगळा कचरा भरल्या गेल्यामुळे सकाळी स्वप्न पडले असेल यात शंका नाही. पण आता उठलो आहोतच तर किमान ज्या विषयावर स्वप्न पडलंय त्या विषयावर एक नागरिक, हिंदू, हिंदू-शेतकरी ह्या दृष्टीने म्हटलं विचार करूयात. मुळात मुद्दा उपस्थित होतो तो परकीयांच्या आक्रमणावरून, ही आक्